पालखी सोहळा

sant-dnyaneshwar महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर या महान संताशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे. एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात. या दिंडीत सहभागी होणा-यांना वारकरी म्हटले जाते. विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूर पर्यंत चालत नेतात. गळयात तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात. एकादशीचे दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो. देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. गावोगावच्या मंदिरात भजन-कीर्तने होतात. महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण होय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा सण होय. अधिक वाचा…

मराठी संत – संत ज्ञानेश्वर

sant-dnyaneshwar महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदयात “माऊली” उच्चारताच लगेच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. त्याकाळी ज्ञानोबा व त्यांच्या भावडांना खूप मोठ्या त्रासाला तोंड दयावे लागले. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व आई रुखमिणी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्विकारल्याचे प्रायश्चित म्हणून गावक-यांनी त्यांना देहांताची शिक्षा दिली. आपल्या मुलांवर समाजाने टाकलेला बहिष्कार परत घ्यावा ह्यासाठी उभयतांनी इंद्रायणीत आपला देहत्याग केला. अधिक वाचा…

मराठी दाग-दागिने

mangalashtak केसांत मोती निरनिराळी पदके वापरून केशरचना करण्याची पध्दत आजही आहे. पुर्वी वेणी घातलेल्या केसांत नगाचा वापर केला जाई. या नगात गोंडे फुलांचा संच असून नाग, केवडा, चंद्र, सूर्य, स्वस्तिक या चित्रांची पदके असत. अंबाडा सजविण्यासाठी नगाचा वापर करत. भांगाच्या मध्यभागी, बिंदी, बोर, भांगसर, बिजवरा यांसारखी आभूषणे लावली जात. आंबोडयातील फुले – ही अंबाडा तसेच वेणी सजवण्यासाठी वापरतात. ही सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत. वेणी – ही कोकणपट्टीत जास्त प्रसिध्द आहे. अधिक वाचा…

मराठी व्रतवैकल्ये – श्रीशिवलीलामृत पोथी – सप्ताह-पारायण पध्दती

mangalashtak कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन ” मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे.” अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे. अधिक वाचा…

मराठी विवाहसोहळा – मंगलाष्टक

mangalashtak वर्षातून दोन महाएकादशी असतात. पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते . आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते. अधिक वाचा…

मोहिली धबधबा

mohili waterfall पावसाळ्यात उंच डोंगरमाथ्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे पाहण हे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो. कर्जत तालुक्याला निसर्गाने “मोहिली धबधबा ” हे देणं दिलं आहे. मोहिली धबधबा हा कर्जत पासून ६ ते ७ कि. मि लांब आहे. उल्हास नदी पार करून प्रत्यक्ष मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई, तेथून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे असे वाटते. डोंगरमाथ्यावरून मुंबई – पुणे रेल्वेचा रस्ताही दिसतो. धबधब्याजवळ पर्यटकांची हॉटेल्स आहेत. मोहिली धबध्ब्याजवळ थंड वातावरणात गरम-गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही और आहे असे इथे येणारे पर्यटक सांगतात. अधिक वाचा…

मराठी कोश वाड्मय

learn मराठी अक्षर वाङ्मयाचा विचार करू लागल्यावर मराठी कोश-साहित्याचा विचार करणे अत्यंत अगत्याचे आहे. कोणत्याही भाषेतील कोश साहित्य हे समाजाचे विचार आणि संस्कृती यांचे संचित धन मानले जाते. ज्या भाषेत विविध विषयांच्या कोशांची निर्मिती होते ती भाषा ज्ञानक्षेत्रात संपन्न बनते. जिज्ञासू अभ्यासकांना, संशोधकांना आणि सार्वजनिक जीवनात कार्य करणा-यांना जरूर ते संदर्भ अल्प वेळात आणि अल्प प्रयासाने शोधण्याचे विश्वासार्ह साधन म्हणजे कोश होत. अधिक वाचा…

खाशी मराठी पंगत

marathi-pangat बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार जेवणाखाणाच्या पध्दती बदलल्या आहेत. आजच्या ‘झटपट’च्या व वेगवान युगात जेवणाच्या पंगती घालायला व त्यासाठी मोकळा वेळ काढायला कुणालाही फुरसद नाही. परंतु जुन्या काळच्या मराठी पंगतींमध्ये एक शान होती. ती कशी? पूजा-अर्चा, मंगल कार्ये आणि सणाशी निगडीत असे विधी पार पडल्यानंतर जेवणाच्या पंगतीची गडबड उडे. बसायला लाकडी नक्षीदार पाट, मागे टेकायला पाट व समोर चौरंग असे. चौरंगांवर चांदीची ताटे, वाटया, तांब्या-भांडी मांडली जात. ताटाभोवती सुरेख महिरपींची रांगोळी रेखली जाई. मुख्य पाहुण्याच्या ताटाभोवती फुलापानांची सजावट होई. सुवासिक उदबत्त्यांचा गंध दरवळू लागे. सनईवर संगीत सुरू होई. चांदीच्या समयांचा मंदसा प्रकाश वातावरण उजळून टाकत असे. अधिक वाचा…

श्लोक, स्तोत्रे व प्रार्थना

pratah-smaran वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। १ ।।
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। २ ।।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।। ३ ।। अधिक वाचा…


अन्न हे पूर्णब्रम्ह

ann-he-purnabramha

मधल्या वेळचे पदार्थ
milk-pohe व्यवस्थित न्याहारी घेणे ही खास पाश्चात्य संस्कृतीतील प्रथा आहे. ‘ब्रेकफास्ट’ या शब्दाचा अर्थच उपवास… 

 

भ्रमंती

bhramanti

भीमाशंकर मंदिर
bhimashankar भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे… 

 

 

 

संस्कृती

sanskruti

पारंपारिक पेहराव
parkar-polk पारंपारिक म्हणून नावाजलेले परकर-पोलके, मुलगी तीन वर्षांची झाली की मुलीची आत्या आपल्या भाची साठी… 

 

कला-क्रिडा

kala-krida

लावणी सामाज्ञी सुलोचना चव्हाण
sulochana-chavan १७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचना चव्हाण यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव सुलोचना कदम… 

 

 

 



सृष्टीरंग

अंतराळ ही एक गूढ पोकळी
antaral अंतराळ ही एक गूढ पोकळी. थंड, अंधारी. मनच नाही पण शरीराला तरंगत ठेवणारी पोकळी. आपण जरी पोकळी…

मुक्तांगण

नवचैतन्य भविष्याचे…
srushti nerkar राज्यात दुष्काळग्रस्त परीस्थिती असताना नाशिक जिल्ह्यातील सृष्टी नेरकर या छोट्या संशोधिकेने गरजेपुरते पाणी वापरण्यासाठी…