आषाढी एकादशी

या सणामागची पौराणिक कथा अशी की ‘मृदुमान्य’ नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करुन ‘तुला कोणाकडूनही मरण येणार नाही’ असा वर शंकराकडून मागून घेतला. पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रम्हा, विष्णू, महेश हे गुहेत लपून बसले. मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता. त्यामुळे तीन दिवस झाले तरी देवांना बाहेर पडता येईना. शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली. तीच ही एकादशी होय. तिने मृदुमान्याला ठार मारले. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो.
अधिक वाचा…
पालखी सोहळा
महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर या महान संताशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे. एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात. या दिंडीत सहभागी होणा-यांना वारकरी म्हटले जाते. विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूर पर्यंत चालत नेतात. गळयात तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात. एकादशीचे दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो. देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. अधिक वाचा…
उपवासाचे पदार्थ
धार्मिक कारणांसाठी उपवास करणे ही भारतीयांची श्रध्दा आहे, प्रथा आहे. महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिकी एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्र यासारख्या निमित्ताने उपवास धरला जातो. कित्येकजण आराध्य देवतेनुसार आठवडयातून एकदा सोमवार, गुरूवार किंवा शनिवार या दिवशी असे वर्षभरही उपवास करीत असतात. रोजच्या जंवणातल्या पदार्थापेक्षा वेगळया वस्तूंपासून बनविलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी आवडीने खाल्ले जातात. उपवासाचा मूळ हेतू – पोटाला विश्रांती देणे – दूरच राहून ‘एकादशी दुप्पट खाशी’ अशी वस्तूस्थिती असते. उपवासाचे पदार्थच तितके चविष्ट असतात हे त्यामागचे खरे कारण त्यामुळे उपवास नसतानासुध्दा साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा यासारखे पदार्थ हल्ली हॉटेलांमधूनही खूपच लोकप्रिय झालेले आहेत. बटाटा, शेंगदाणे, रताळी, राजगिरा, वरई वगैरे वापरून केलेले खास महाराष्ट्रीय उपवासाचे पदार्थ व त्याच्या पाककृती या विभागात दिलेल्या आहेत.
अधिक वाचा…
अनावश्यक ते अत्यावश्यक व्हाया कोरोना
कोरोना विषाणूने अवघ्या जगात थैमान मांडले आहे. जागतिक पातळीवर आणि देश पातळीवर त्यासोबत लढण्यासाठी अविरत प्रयत्न चालू झाले आणि त्यातूनच आला हा लॉकडाऊन. एका विशिष्ट लयीत चाललेले आपले आयुष्य एकदम खीळ लागल्यागत थंडावले. सुरुवातीला पहिला आठवडा सक्तीने का होईना, सगळे घरी होते – अगदी ब्रेकफास्टपासून रात्री झोपेपर्यंत. ह्या आनंदात घरोघरच्या सुगरणी सुखावल्या. मुलांच्या, नवरोबांच्या फर्माइशी पूर्ण करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला. त्यामुळे डालगोना कॉफी, बनाना आईसक्रीम, पाव, रुमाली खाकरा, दहीवडे ट्रेंडींग झाले. व्हॉटसअप स्टेटस, इन्स्टा स्टोरीज आणि फेसबुक पोस्टवर ह्या पदार्थांचे फोटो मानाने अवतरले. अधिक वाचा…
वारली चित्रकला

ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासींची चित्रकला ही त्यांच्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग आहे. एक सहजगत्या उमलणारी भावाभिव्यक्ति आहे. भोळया भाबडया आदिवासींच्या खडतर आयुष्यातला तो एक आनंदाचा क्षण आहे. त्यांचं वेगळं जग, रीतीरिवाज, सण, उत्सव, दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग नकळत हळुवारपणे त्यांच्या कुडाच्या भिंतींवर साकार होत जातात. गावात एखादं लग्न ठरलं की पंचक्रोशीतले लहान मोठे पुरूष-स्त्री चित्रकार उत्स्फूर्त भावनेने जमा होतात. मोठया उत्साहानं सारी घरं रंगवून टाकतात. असं त्यांचं जगणं आहे. रानफुलासारखं, निखळ नि मोकळं.
अधिक वाचा…
खाशी मराठी पंगत

बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार जेवणाखाणाच्या पध्दती बदलल्या आहेत. आजच्या ‘झटपट’च्या व वेगवान युगात जेवणाच्या पंगती घालायला व त्यासाठी मोकळा वेळ काढायला कुणालाही फुरसद नाही. परंतु जुन्या काळच्या मराठी पंगतींमध्ये एक शान होती. ती कशी?
पूजा-अर्चा, मंगल कार्ये आणि सणाशी निगडीत असे विधी पार पडल्यानंतर जेवणाच्या पंगतीची गडबड उडे. बसायला लाकडी नक्षीदार पाट, मागे टेकायला पाट व समोर चौरंग असे. चौरंगांवर चांदीची ताटे, वाटया, तांब्या-भांडी मांडली जात. ताटाभोवती सुरेख महिरपींची रांगोळी रेखली जाई. मुख्य पाहुण्याच्या ताटाभोवती फुलापानांची सजावट होई. सुवासिक उदबत्त्यांचा गंध दरवळू लागे. सनईवर संगीत सुरू होई. चांदीच्या समयांचा मंदसा प्रकाश वातावरण उजळून टाकत असे.
अधिक वाचा…
हमखास चुकणारे शब्द

-हस्वऐवजी दीर्घ उच्चार केल्यास शब्दाचा अर्थ कसा बदलतो हे या उदाहरणावरून दिसन येईल. शिर म्हणजे डोके, शीर म्हणजे रक्तवाहिनी. या शब्दाचा वाक्यात वापर करताना त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेतल्यास शब्द लिहिताना अडचण येणार नाही. मौंजीबंधन मनस्ताप अनिर्वचनीय दुष्कृत्य मूर्च्छा जितेंद्रिय महीपाल स्वादुपिंड स्थितिस्थापक शालिनी षड्रिपू गुंजारव षोडशोपचार विजिगीषा भित्तिचित्र भीकबाळी मीनाक्षी धीरोदात्त नीरद संचित पाणिग्रहण माणुसकी शिरस्त्राण अतिथी भानूदय नीरज हळूहळू अमानुष भ्रमिष्ट अस्थिपंजर अत्युच्च टिपूर योगिराज गांभीर्य उखळणी कित्येक बुध्दिबळ जीर्णोध्दार किमती
अधिक वाचा…
अन्न हे पूर्णब्रम्ह

मधल्या वेळचे पदार्थ
व्यवस्थित न्याहारी घेणे ही खास पाश्चात्य संस्कृतीतील प्रथा आहे. ‘ब्रेकफास्ट’ या शब्दाचा अर्थच उपवास…
भ्रमंती

भीमाशंकर मंदिर
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे…
संस्कृती

पारंपारिक पेहराव
पारंपारिक म्हणून नावाजलेले परकर-पोलके, मुलगी तीन वर्षांची झाली की मुलीची आत्या आपल्या भाची साठी…
कला-क्रिडा

लावणी सामाज्ञी सुलोचना चव्हाण
१७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचना चव्हाण यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव सुलोचना कदम…
सृष्टीरंग
अंतराळ ही एक गूढ पोकळी
अंतराळ ही एक गूढ पोकळी. थंड, अंधारी. मनच नाही पण शरीराला तरंगत ठेवणारी पोकळी. आपण जरी पोकळी…
मुक्तांगण
नवचैतन्य भविष्याचे…
राज्यात दुष्काळग्रस्त परीस्थिती असताना नाशिक जिल्ह्यातील सृष्टी नेरकर या छोट्या संशोधिकेने गरजेपुरते पाणी वापरण्यासाठी…