महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदयात “माऊली” उच्चारताच लगेच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. त्याकाळी ज्ञानोबा व त्यांच्या भावडांना खूप मोठ्या त्रासाला तोंड दयावे लागले. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व आई रुखमिणी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्विकारल्याचे प्रायश्चित म्हणून गावक-यांनी त्यांना देहांताची शिक्षा दिली. अधिक वाचा…
मराठी माणूस कोण, याची एक साधी-सोपी पण अर्थपूर्ण व्याख्या आचार्य प्र.के. अत्रे यांनी केली होती. ज्याला तुकोबाचा एकतरी अभंग तोंडपाठ येतो, तोच अत्र्यांच्या मते खरा मराठी माणूस! याच चालीवर असे म्हणता येईल की, ‘ग्यानबा – तुकाराम’ हा मंत्र ज्याच्या कानी पडलेला नाही असा एकतरी मराठी माणूस आढळेल का? ‘ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस ‘ या शब्दात जिचे वर्णन केले जाते, त्या परंपरेशी प्रत्येक मराठी माणूस प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे जोडलेला असतो. ‘ग्यानबा-तुकाराम’ याप्रमाणे ‘शिवाजी महाराज की जय’ या मंत्रानेसुध्दा मराठी माणूस भारलेला असतो. अशी काय बरं जादू आहे ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी या नावांमध्ये? ही तुमच्या-आमच्यासारखीच हाडा-मांसाची माणसे होती; पण कालच्या आणि आजच्या मराठी समाजाला व्यापून राहिलेल्या सांस्कृतिक बंधुभावाची ती महान प्रतीके होती. अधिक वाचा…
केसांत मोती निरनिराळी पदके वापरून केशरचना करण्याची पध्दत आजही आहे. पुर्वी वेणी घातलेल्या केसांत नगाचा वापर केला जाई. या नगात गोंडे फुलांचा संच असून नाग, केवडा, चंद्र, सूर्य, स्वस्तिक या चित्रांची पदके असत. अंबाडा सजविण्यासाठी नगाचा वापर करत. भांगाच्या मध्यभागी, बिंदी, बोर, भांगसर, बिजवरा यांसारखी आभूषणे लावली जात.
आंबोडयातील फुले – ही अंबाडा तसेच वेणी सजवण्यासाठी वापरतात. ही सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत. वेणी – ही कोकणपट्टीत जास्त प्रसिध्द आहे. अधिक वाचा…
मराठी अक्षर वाङ्मयाचा विचार करू लागल्यावर मराठी कोश-साहित्याचा विचार करणे अत्यंत अगत्याचे आहे. कोणत्याही भाषेतील कोश साहित्य हे समाजाचे विचार आणि संस्कृती यांचे संचित धन मानले जाते. ज्या भाषेत विविध विषयांच्या कोशांची निर्मिती होते ती भाषा ज्ञानक्षेत्रात संपन्न बनते. जिज्ञासू अभ्यासकांना, संशोधकांना आणि सार्वजनिक जीवनात कार्य करणा-यांना जरूर ते संदर्भ अल्प वेळात आणि अल्प प्रयासाने शोधण्याचे विश्वासार्ह साधन म्हणजे कोश होत. अधिक वाचा…
रूग्णांवरील उपचारपध्दतीत आधुनिक औषध विज्ञाना इतकीच परंपरागत आयुर्वेद चिकित्सा व औषधे प्रभावी ठरू शकतात, या वास्तवाचा संशोधनपर वेध घेत वैद्यक क्षेत्राला नवी दिशा देणा-या नायर पालिका इस्पितळाच्या डॉ. शरदिनी डहाणूकर ह्या लोकप्रिय अधिष्ठात्री होत्या. आपल्या संशोधनपर वृत्तीने आणि माणुसकीचा वसा जपलेल्या प्रेमळ स्वभावाने भारतीय वैद्यक व अन्य अनेक क्षेत्रात नाव कमावलेल्या डॉ. शरदिनींचा जन्म १७ ऑक्टोबर १९४५ रोजी मुंबईत झाला. गोव्यातील पणजी येथील बेतीम वेरे या गावच्या पै धुंगट या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डहाणूकर यांचे वडील भिकू पै धुंगट उद्योगानिमित्त मुंबईत आले आणि येथेच स्थायिक झाले. बुध्दीने कुशाग्र आणि चिकित्सक असलेल्या डॉक्टर ही पदवी संपादित केल्यानंतर फार्माकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अधिक वाचा…
बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार जेवणाखाणाच्या पध्दती बदलल्या आहेत. आजच्या ‘झटपट’च्या व वेगवान युगात जेवणाच्या पंगती घालायला व त्यासाठी मोकळा वेळ काढायला कुणालाही फुरसद नाही. परंतु जुन्या काळच्या मराठी पंगतींमध्ये एक शान होती. ती कशी? पूजा-अर्चा, मंगल कार्ये आणि सणाशी निगडीत असे विधी पार पडल्यानंतर जेवणाच्या पंगतीची गडबड उडे. बसायला लाकडी नक्षीदार पाट, मागे टेकायला पाट व समोर चौरंग असे. चौरंगांवर चांदीची ताटे, वाटया, तांब्या-भांडी मांडली जात. ताटाभोवती सुरेख महिरपींची रांगोळी रेखली जाई. मुख्य पाहुण्याच्या ताटाभोवती फुलापानांची सजावट होई. सुवासिक उदबत्त्यांचा गंध दरवळू लागे. सनईवर संगीत सुरू होई. चांदीच्या समयांचा मंदसा प्रकाश वातावरण उजळून टाकत असे.
अधिक वाचा…
सिंहस्थ महापर्वणी
हे गंगे!
अब त्वद्दर्शनान्मुक्ति: न जाने स्नानजं फल
गंगेमुळे विश्व तीर्थरुप बनते।
सिंहस्थ म्हणजे सूर्य, चंद्र व गुंचा त्रिवेणी संगम!
वृध्दगोदेला भेटण्यासाठी विश्वनाथासह गंगा कुशावर्तात येते,
गंगालहरी व गोदालहरीचे ऐक्य कुशावर्तात होत. अधिक वाचा…



