नारळी पौर्णिमा ( श्रावण शुध्द पौर्णिमा)
समुद्राकाठी रहाणा-या प्रामुख्याने कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळयात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे वगैरैची ये-जा या काळात बंद असते. जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात, या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्राला नारळ अर्पण करताना ताम्रनाणी नारळास बांधून नारळ समुद्रात सोडतात. अधिक वाचा…
राखी पौर्णिमा (श्रावण शुध्द पौर्णिमा)
हाच दिवस राखीपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. भावाने आपले रक्षण करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. व्रतबंध झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात. याच दिवशी लोक श्रावणी करतात. या दिवशीचे मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात. तसेच नारळाच्या/ खोब-याच्या वडया, नारळाची बर्फी, नारळाच्या करंज्या वगैरे पदार्थ करून हा सण साजरा करतात.
अधिक वाचा…
महाराष्ट्रातील गड-किल्ले

अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड-कोट-किल्ले अन् दुर्गांमधून इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. या बळीवंत दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय, आक्रमक, धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केलं आणि
अधिक वाचा…
बर्की धबधबा, कोल्हापूर
धरणीमाता हिरावा शालू लेण्यासाठी पावसाची वाट पहात असते. डोंगरदर्यांमध्ये पडणारा धुवाँधार पाऊस, त्यामुळे डोंगरकपारीमधील छोटया-मोठया कपारीमध्ये निर्माण होणारे ओहोळ आणि हे ओहळ कोसळल्यामुळे त्याचे झालेले धबधब्यातील रुपांतर, त्याचा झुळझुळणारा खळाळत जाणारा आवाज आपल मन गुंतवून टाकतो. आणि हे पाणी सर्व डोंगरदर्यांना हिरवा शालू कधी लपेटून देतो, ते आपल्याला कळतच नाही. कोल्हापूरनगरी महालक्ष्मीचे अधिष्ठान, शिवरायांची स्नुषा ताराराणी त्यांनी स्थापन केलेली मराठयाची ही नगरी म्हणजे कोकण आणि घाट माथा यांचा सुंदर संगम आहे. पर्यटकांना भुरळ घालतील अशा अनेक स्थळांचं आगर या जिल्ह्यात आपणाला येण्याचा आग्रह करीत आहे. अशाच एका पावसाळी पर्यटन स्थळा विषयी जाणून घेऊ. अधिक वाचा…
पावनखिंड – विशाळगडा

पन्हाळगडाच्या वेढयातून बाहेर पडलेले शिवराय विशाळगडी पोहोचले तेव्हां शिवा न्हावी काशीद स्वराज्याच्या कामी खस्त झाला होता अन् गजापूरच्या घोडखिंडीत प्राणांची बाजी लावून ती खिंड आपल्या रुधिराभिषेकाने केव्हांच पावन करून बाजी प्रभू देशपांडे स्वर्गलोकी निघून गेले होते. विशाळगडच्या गहन अरण्यात शिर्के अन् मो-यांनी मलिक-उल- तुजारला अस्मान दाखवलं होतं. या सा-यांची आठवण करून देणारा, हा बेलाग दुर्ग, शिलाहार- राष्ट्रकूट अन् चालुक्यांच्याही स्मृती जागवितो आहे. याचे आधीचे नाव होते ‘खेळणा’.
अधिक वाचा…
खाशी मराठी पंगत

बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार जेवणाखाणाच्या पध्दती बदलल्या आहेत. आजच्या ‘झटपट’च्या व वेगवान युगात जेवणाच्या पंगती घालायला व त्यासाठी मोकळा वेळ काढायला कुणालाही फुरसद नाही. परंतु जुन्या काळच्या मराठी पंगतींमध्ये एक शान होती. ती कशी?
पूजा-अर्चा, मंगल कार्ये आणि सणाशी निगडीत असे विधी पार पडल्यानंतर जेवणाच्या पंगतीची गडबड उडे. बसायला लाकडी नक्षीदार पाट, मागे टेकायला पाट व समोर चौरंग असे. चौरंगांवर चांदीची ताटे, वाटया, तांब्या-भांडी मांडली जात. ताटाभोवती सुरेख महिरपींची रांगोळी रेखली जाई. मुख्य पाहुण्याच्या ताटाभोवती फुलापानांची सजावट होई. सुवासिक उदबत्त्यांचा गंध दरवळू लागे. सनईवर संगीत सुरू होई. चांदीच्या समयांचा मंदसा प्रकाश वातावरण उजळून टाकत असे.
अधिक वाचा…
हमखास चुकणारे शब्द

-हस्वऐवजी दीर्घ उच्चार केल्यास शब्दाचा अर्थ कसा बदलतो हे या उदाहरणावरून दिसन येईल. शिर म्हणजे डोके, शीर म्हणजे रक्तवाहिनी. या शब्दाचा वाक्यात वापर करताना त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेतल्यास शब्द लिहिताना अडचण येणार नाही. मौंजीबंधन मनस्ताप अनिर्वचनीय दुष्कृत्य मूर्च्छा जितेंद्रिय महीपाल स्वादुपिंड स्थितिस्थापक शालिनी षड्रिपू गुंजारव षोडशोपचार विजिगीषा भित्तिचित्र भीकबाळी मीनाक्षी धीरोदात्त नीरद संचित पाणिग्रहण माणुसकी शिरस्त्राण अतिथी भानूदय नीरज हळूहळू अमानुष भ्रमिष्ट अस्थिपंजर अत्युच्च टिपूर योगिराज गांभीर्य उखळणी कित्येक बुध्दिबळ जीर्णोध्दार किमती
अधिक वाचा…
अन्न हे पूर्णब्रम्ह

मधल्या वेळचे पदार्थ
व्यवस्थित न्याहारी घेणे ही खास पाश्चात्य संस्कृतीतील प्रथा आहे. ‘ब्रेकफास्ट’ या शब्दाचा अर्थच उपवास…
भ्रमंती

भीमाशंकर मंदिर
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे…
संस्कृती

पारंपारिक पेहराव
पारंपारिक म्हणून नावाजलेले परकर-पोलके, मुलगी तीन वर्षांची झाली की मुलीची आत्या आपल्या भाची साठी…
कला-क्रिडा

लावणी सामाज्ञी सुलोचना चव्हाण
१७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचना चव्हाण यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव सुलोचना कदम…
सृष्टीरंग
अंतराळ ही एक गूढ पोकळी
अंतराळ ही एक गूढ पोकळी. थंड, अंधारी. मनच नाही पण शरीराला तरंगत ठेवणारी पोकळी. आपण जरी पोकळी…
मुक्तांगण
नवचैतन्य भविष्याचे…
राज्यात दुष्काळग्रस्त परीस्थिती असताना नाशिक जिल्ह्यातील सृष्टी नेरकर या छोट्या संशोधिकेने गरजेपुरते पाणी वापरण्यासाठी…