श्री गणेश पूजा कशी करावी ?

ganpati puja आचमन : ॐ केशवाय नम:। ॐ नारायणाय नम:। ॐ माधवाय नम:। या नावांनी दोनदा आचमने करावी. ॐ गोविंदाय नम:। या नावाने पाणी सोडावे. पुढील नावे हात जोडून म्हणावीत. नंतर प्राणायाम करावा. 
आसनशुध्दी : भूमीला स्पर्श करून ही शुध्दी करावी लागते. 
भूतोत्सारण : हातात अक्षता घेऊन दक्षिणेस फेकाव्या. 
षडंगन्यास : शरीरशुध्यर्थ मांडी घालून दोन्ही हातांनी न्यास करावे. 
कलश पूजा : पाणी भरलेल्या कलशाला गंध-अक्षता लावलेले फूल चिकटवावे. भारतीय संस्कतीत कलश हे मांगल्याचे प्रतीक. शुभकार्यात कलशाची पूजा करण्याची प्रथा आहे. चारही वेदांचे यात वास्तव्य मानले असून आपल्या सहा अंगांसह सर्व वेद या कलशात आहेत. 
शंखपूजा : शंखाला स्नान घालून गंध, पुष्प घालावे. शंखमुद्रा दाखवून नमस्कार करावा. 
घंटा-पूजा : घंटानादं कुर्यात्-घंटा वाजवावी. घंटेला गंध,अक्षता, फूल, व हळदकुंकू वाहावे. 
दीपपूजा : समईला फुलाने गंध, फूल व हळदकुंकू लावावे. 
प्रोक्षण : दुर्वांनी पूजा साहित्यावर व स्वत:वर पाणी शिंपडावे. 
प्राणप्रतिष्ठा : दोन दुर्वांकुरांनी गणपतीला स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा करावी. ताम्हनात एक पळी पाणी उजव्या हातावरून सोडावे. नंतर दुर्वांकुरांने गणपतीच्या पायाला स्पर्श करावा.
अभिषेक : गणपतीवर फुलाने किंवा दुर्वांकुराने पाणी शिंपडावे आणि अभिषेक करावा.

गणपतीला मोदक प्रिय का?

ganpati modak गणपतीला देवांनी अथक परिश्रम करून अमृताचा मोदक तयार केला. तो घेऊन ते शंकराकडे आले. पार्वतीच्या हातात मोदक देऊन परत गेले.’स्कंद’व’गणेश’मोदक मिळावा म्हणून पार्वतीजवळ येऊन बसले.

पार्वती म्हणाली,’हा महाबुध्दी मोदक आहे. याचा वास घेतला तरी अमरत्व प्राप्त होतं. जो हा मोदक खाईल, तो सर्व शास्त्रांत प्रवीण होईल व शस्त्रास्त्रविद्येतही निपुण होईल. हे ऐकल्यावर स्क.द व गणेश हे दोघेही ‘मला मोदक हवा’, असा हट्ट करू लागले. तेव्हा पार्वतीने एक युक्ती शोधली. ती आपल्या पुत्रांना म्हणाली, ‘तुम्ही दोघंही पृथ्वीप्रदक्षिणेला जा. जो आधी करून येईल, त्याला मी मोदक देईन.’स्कंद लगेच पृथ्वीप्रदक्षिणेला निघाला; परंतू गणपती मात्र तिथेच थांबला. त्यानं एका शिलाखंडावर शंकर-पार्वतींना बसवीलं. त्या दोघांची यथासांग पूजा केली. त्या दोघांनाच एक पूर्ण प्रदक्षिणा घातली व तो शंकर-पार्वतीपुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मधुर वाणीनं म्हणाला, ‘आई-वडीलांना प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वीप्रदक्षिणा. सर्व तीर्थात केलेलं स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार. सर्व यज्ञयागादी व्रतं व साधना यांचं पुण्य आई-वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागांएवढंही होऊ शकत नाही.’

शंकर-पार्वतीला गणपतीच्या कुशाग्र बुध्दीचं कौतुक वाटलं. पार्वतीनं गणपतीला आनंदानं तो दिव्य मोदक दिला. लहानपणी गजाननानं दाखवलेली हुषारी, ते बुध्दीची देवता होणार आहेत हे दाखवून गेली.

गणपतीला दुर्वा प्रिय का?

ganpati durva एकदा मायावी शक्तीपासून अनलासुर नावाचा भयानक असुर उत्पन्न झाला. त्याच्या कानठळया बसविणाऱ्याआवाजाने पृथ्वीचाही थरकाप उडत होता. त्याचे डोळे लालबुंद होते.त्यांतून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या.त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभे राहत नव्हते. या अनलासुराने देवांनाही दे माय धरणी ठायकरून सोडले होते.संपूर्ण देवलोक ह्या राक्षसाच्या अत्याचारामुळे भयभीत झाले होते.

अखेर सर्व देव गणपतीला शरण गेले. त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती बालरूपात प्रकट झाला.गणपतीने देवांना अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले. अनलासुराविरूध्द युध्द पुकारले.

अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुरालाच गिळंकृत केले. त्या राक्षसाचा नाश तर झाला पण इकडे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. तो गडबडा लोळू लागला.

त्यानं सर्वांगाला चंदनाचा लेप दिला. तरीही दाह काही थांबेना. तेव्हा देवांनी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली.त्यामुळे गणपतीला भालचंद्रअसे नाव पडले.विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले त्यामुळे त्यास पद्मपाणी असे नाव मिळाले. भगवान शंकराने आपल्या गळयातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला. वरूणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरी अंगाची लाही काही थांबेना.गणपती बिचारा तळमळत जमिनीवर लोळत होता.

इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले. प्रत्येकाने एकवीस-एकवीस दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि चमत्कार झाला. गणपतीला तात्काळ बरं वाटलं. त्याच्या अंगाची आग शांत झाली.

गणपती आनंदून म्हणाला, माझ्या अंगाची लाही शांत होण्यासाठी सर्व देवांनी नानाविध उपा. केले, परंतु दुर्वांनी माझ्या अंगाचा दाह कमी झाला. यापुढे जो मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञयाग, व्रतं आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभेल.