मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

मैत्री

मैत्री हे दोनच शब्द असले तरी त्यात बरीच महानता आहे. जसे ‘आई’ या शब्दात महानता असते.

‘मैफलीत रंगून जाते ती गायत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री’

मैत्री हा विश्वाचा एक धागा असा आहे……………….

जो रक्ताची नातीचं काय पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो

खरंच का रे…………………………..

एखाद्यावर मन लावण्यासाठी सुंदर असावं लागतं का ?
एखाद्यावर प्रेम करण्यासाठी श्रीमंत असावं लागतं का ?
आणि एखाद्याशी मैत्री करण्यासाठी सुंदर आणि श्रीमंत दोन्हीही असावं
लागतं का ?

मग त्याच्याकडे मन नसलं तरी चालतं………

तर नाही……………

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्याकडे असावं लागतो आपल्या मैत्रीचा आदर
परंतु…………..

मैत्री करणारे तुला खूप भेटतील
परंतु निभावणारे कमी असतील
मग सांगा……खरं मित्र कसे असतील
तर……..

कधी भांडणाची साथ
कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात
अशी असते निस्वा:र्थ मैत्रीची जात.
पण या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो तर……

नेत्रकडा ओलावल्या आणि शब्द ओठावरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
काही जण मैत्री कशी करतात तर…….

काही जण उबेसाठी शेकोटी पेटवितात जणू शेकोटीची कसोटी पाहतातकाही जण स्वार्थासाठी मैत्री करतात जणू कामाच्या वेळेस आपली कसोटी पाहतात
मग सांगा शेकोटीत आणि मैत्रीत काय फरक दोन्ही पण एकच जाणवतात.
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
अशी असते ती मैत्री
जीवनाला खरा अर्थाने समजणारं
ठेवा या लक्षात गोष्टी
माझ्याशी सुध्दा कराल ना तुम्ही गट्टी !!!

श्रीकला मोरे

अश्रु फुले

मला आठवतात तुझी पावले
निजलेल्या धारांतुन झोंबणा-या वा-यांतून
पावसातून माझ्यासवे सप्तपदी चालणारी……..
मला आठवतो तुझ्या डोळयातील बेधुंद श्रावण
एका झाडाखाली एका छत्रीतून
आसमंतातील पावसासवे माझ्यावर अविरत बरसणारा…..
मला आठवतात तूझी अबोल वचने
हातात हात हृदयात हृदय गुंफुन
झुकत्या मानेन भाबडया डोळयांनी वदलेली……
मला आठवतात तुझ्या डोळयातील ती सारी साधी भोळी स्वप्न मावळत्या उन्हात नदिकाठाच्या रानात
माझ्या खांद्यावर डोक ठेवुन तू माझ्यासवे जागेपणी पाहिलेली……
मला आठवतात हे सारे क्षण
तू बरोबर असताना तू बरोबर नसताना
मदहोशीत तुझ्यासवे मी बेफानपणे जगलेले……..
अन मग आठवतात मला माझीच अश्रु फुले, क साथ एका वाटेवर माझी सावली होऊन चालल्यानंतर
अघोरी वळणावर तू माझ्यापासून दूर वळुन जाताना
तूझ्या पाऊलखुणांवर मी मुकपणे वाहिलेली…….
यानंतर मात्र मला काहिच आठवत नाही
कारण तुझ्या पाऊलखुणा आणि माझी अश्रू फुले
याशिवाय दुसरं काही मनात साठवतच नाही
असेल आता तोच पाऊस तोच वारा
आणि नदिकाठचा तोच आसमंत सारा
तिच वाट मी ही तोच तिच वळणे पुन्हा पुन्हा
नि वळणागणिक हृदय जाळणा-या त्याच तुझ्या पाऊलखुणा कालचक्रासवे बदलले जरी तु सर्व काही……..
तरी मी मात्र तोच राहिन…….
हृदयावरील या पाऊलखुणांवर तुझ्या
अश्रु फुले ही अजन्म वाहिन…….
अश्रु फुले ही अजन्म वाहिन……..

सचिन काळे

उभारू बंड

निसर्ग आहे मित्र आमचा
रक्षण त्याचे सर्व करू
माती, पाणी, प्राणी, पक्षी
रोपे, झुडपे किती तारू

या सर्वांची उधळण जी
आज होतसे सर्सास
प्राणवायू तो कमी झाला
गुदमरतो श्वासोश्वास

यंत्राचा खडखडाट चाले
असह्य हा धांगाधिंगा
उकिरडे रस्त्यावर आले
डास किडे घालती पिंगा

क्षणाक्षणाला रस्तोरस्ती
किती माजले धुरकांडं
थांबविण्याला प्रदुषणे ही
चला उभारू या बंड

भास्कर तिजारे

सण दिवाळीचा

लखलखल्या असंख्य दीपमाला
चोहीकडे प्रकाश जाहला
असा हा आनंदाचा व मांगल्याचा
दिवाळी सण आला

घरोघरी पण्त्यांची रास
देवापुढे फराळांची आरास
चकल्या, लाडू, करंज्यांचा
पसरला मंद-धुंद सुवास

फटाके आणि वसने नूतन
झगमगले सकलांचे जीवन
चला सगळे करू साजरा
आनंदोत्सव हा आगळा-वेगळा 

निलेश