मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

जय नावाचा इतिहास

काढल्या चारशे धावा। दीडशे कळस वरी व्हावा॥
गडी चार गमावून फक्त। स्कोअर शंभरच झाला॥1॥

हे नशीब म्हणती काही। कुणी फुकटच निराश होई॥
मग निराश काही स्फुरले। हारतील कसोटी म्हणाले॥2॥

तरीही तो खचला नाही। तिमिरात थांबला नाही॥
कर्मनिष्ठ चुकला नाही। एकाग्र लक्ष्यही पाही॥3॥

अहोरात्र लढला तोही। पाठीस लक्ष्मण राही॥
धावांचे डोंगर रचले। आशेचे दीप उजळले॥4॥

तो द्विशतकाशी रूकला। निस्तब्ध सारे झाले॥
तो परत जेधवा आला। नैराश्य निवळले होते॥5॥

मग अजित उदया आला। विजयाचे कारण झाला॥
तेंव्हाही काही जणांना। वाटले गमवतील संधी॥6॥

जरी अवघड नव्हते काही। ते अवघड करतच गेले॥
मग पुन्हा राहूलच आला। सोबतही लक्ष्मण झाला॥7॥

चेंडूचे रोख अन् टप्पे। उसळीला फसवत होते॥
ती फिरकी वळते कोठे। मुळी कुणास कळले नव्हते॥8॥

स्थिरचित्त होऊनी दोघे। दत्तचित्त होते झाले॥
ते लढले खेळची त्यांचे। देशाला गौरव झाले॥9॥

लक्ष्मणही कामी आला। अन् राहूलही थकलेला॥
पण निराश मुळी तो नव्हता। अन् संग अजितही आला॥10॥

मग त्यांनी लिहीली गाथा। हो, देशाचा उन्नत माथा॥
ते खेळातची समरसले। ग्रह साथ तयांना झाले॥11॥

पत्रकार मग ते त्याला। प्रतिक्रिया विचारत होते॥
‘मज धन्य वाटले वदला। ते साऱ्याचे यश होते’॥12॥

नरेंद्र गोळे

आस

श्रावणात सासूरवाशीणींची गर्दि वाढायला लागलीय….
त्यात तुही सासरहून आलीयस…..
मी पाहतोय तुझ्या त्या चोरटया नजरेला……
पण मला घायाळ करणारे तीर दिसलेच नाहित….
दिसल्या त्या तुझ्या हसण्याच्या उर्मट छटा !
अन् गहाळ झालेल्या आठवणी !
पण आज तुला काही विचारायचयं……
आठवतं तुला…. आठवतं तुला…..
धुकं कसं दिसतं म्हणून तुझ्या केसात सोडायला
लावलेला तो सिगारेटचा धूर !
पावसाचा प्रत्येक थेंब झेलत खाल्लेली ती
जुहू चौपाटी वरची पाणीपुरी !
छत्रीचं ठिगळ बूजावं म्हणून तु लावलेला
तो पउचवतजमक बंती !
आठवतं तुला….
माळशेज घाटात त्या खिन्न काळोखात, एकमेकांच्या
डोळयात पाहत, अन् श्वासांशी भांडत घालवलेली ती रात्र !
मी येणार म्हणून पायाचा त्रिकोण करून, दृष्टिआड येणाऱ्या
केसांना मागे सारत व्यक्त केलेला तो राग !
धुक्यांच्या गर्दित अगतिकतेने शोधायचीस
ते माझे बाहूपाश !
आठवतं तुला….
लोकलच्या गर्दित या दंडात दहा हत्तीचं बळ
आणून तुझ्या भोवती उभारलेलं ते संरक्षण कवच !
शिंपल्यांच्या पैंजणांपायी दुष्ट उन्हात अलिबागच्या
वाळूवर केलेली ती वणवण !
उन्हाची झळ, पावसाचा ओलावा, अन् थंडीचा गारवा
जाणवू नये म्हणून तुझ्यासाठी उभारलेलं ते मातीचं घर !
आठवतं तुला….
अन् आता म्हणतेस विसर…अन् आता म्हणतेस विसर….
विसरेन…. विसरेन….साक्षी ठेवलेल्या…
पौर्णिमेला सप्तरंगांत न्हालेला, त्याच्या रूपाला भुलायला
लावून आपल्यावर कब्जा करणाऱ्या त्या चंद्राला !
तुझ्यावर ओवाळून टाकताना, काजव्यांचा थवा
भासणाऱ्या त्या चांदण्यांना !
झाडावरल्या ओघळणाऱ्या त्या प्राजक्तांना !
राणीबागेतल्या पाखरांच्या किलबिलाटांपासून जुहू वरच्या
मानवी किलबिलाटांना !
पर्जन्यवृष्टीच्या तालावर झुलणाऱ्या माळशेज
घाटातल्या त्या धबधब्याला ! कारण….. कारण….
या निसर्गदूतांबरोबर तुलाही विसरेन….. पण…. पण…..
मला तो सिगारेटचा धुर हवाय !
त्या पावसाचा प्रत्येक थेंब हवाय !
ते छत्रीचं ठिगळ हवय !
त्या माळशेज घाटात घालवलेली ती रात्र हवीय !
आणि…. तुझ्यासाठी उभारलेलं आता दगडांची उशी,
मातीची गादी करून निजलेलं ते माझं मातीचं घरही हवय !
सोबत…. सोबत…..
तुझ्याबरोबर घालवलेले ते १८२५ दिवसही हवेत !
कारण… कारण…… मला याच भांडवलांवर नव्याने आयुष्य उभारायचयं…..
नव्यानं आयुष्य उभारायचयं….

निनाद…